
दिल्ली : मेरठमधील सरधना येथील केली गावात रविवारी काँग्रेसतर्फे महापंचायत बोलावण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी या ठिकाणी जनतेला संबोधित केले. “कृषी कायदे मागे घेण्यासाठी कितीही वर्षे लागले तरी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत उभी राहील. यासाठी शंभर दिवस किंवा शंभर वर्षे लागले तरी शेतकरी आणि काँग्रेस मागे हटणार नाही. जोपर्यंत ताकद आहे तोवर लढणार… संसदेत शेतकऱ्यांचा आंदोलनजीवी, परजीवी उल्लेख करून त्यांचा अपमान करण्यात आला. दिल्लीतील सीमेप्रमाणेच प्रत्येक गावागावांत आंदोलन करा. तुम्ही संकटात असाल तेव्हा काँग्रेस तुमच्या पाठीशी उभी राहील. सुख आणि दु:ख काहीही असो आम्ही तुमच्यासाठी कायम उभे राहू. तुमची लढाई माझी आहे.” असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
‘हम दो हमारे दो’चे सरकार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनपासून पाकिस्तान सर्व फिरून आले. ‘हम दो हमारे दो’ मित्र सरकार चालवत आहेत. जे प्रकर्षाने दिसून येत आहे. सरकारला तुमचे ऐकावेच लागेल. सुनावणीशिवाय सरकार पुढे जाऊ शकणार नाही असे वातावरण तयार करा.” असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
Do not lose hope, it has been 100 days. Even if it takes 100 weeks or 100 months, we will continue this fight with you till this government takes back its black laws: Congress leader Priyanka Gandhi Vadra during Kisan Mahapanchayat in Meerut pic.twitter.com/BvI4xDuxV4
— ANI UP (@ANINewsUP) March 7, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला