
मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th-12th Exams) सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. तसेच (‘We can do it offline Exam’) ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भातील मोहीम राज्यभर राबविण्यात येईल, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले.
बालभवन येथे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परिक्षांबाबत बैठक झाली. या बैठकीत शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी परीक्षा घेणे योग्य आहे. यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावे. सर्वांनी एकत्र येऊन शासनासोबत ही मोहीम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांची सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठी सहकार्य करावे.”
In a meeting with parents, teacher representatives, we've agreed to work together to ensure a safe avenue to conduct HSC/SSC exams in offline mode. We welcome the insightful suggestions made by all participants. (1/2) #ExamReady#LetsWinThis#ParikshaKoTaiyar @scertmaha pic.twitter.com/zWHRIS8Eqe
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 11, 2021
विद्यार्थ्यांची सुरक्षा, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि परिक्षेच्या पूर्वतयारीस वेळ मिळावा, या सर्व बाबींचा विचार करून वेळापत्रक तयार केले आहे. वेळापत्रकाबाबत अधिक सूचना असल्यास सल्लागार समितीशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. प्रॅक्टीकल परीक्षा, जनरल सादर करणे याबाबत संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एकसारखा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
“सह्याद्री वाहिनीवर शासनामार्फत व्याख्यानमाला सुरू असून, परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे प्रश्न, स्वाध्याय यासाठीही कार्यक्रम घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामान्यत: पडणाऱ्या प्रश्नांबाबत वेबसाईटवर लवकरच ‘एफएक्यु’ (FAQ) देण्यात येईल. ज्या निवासी शाळा बंद आहेत, त्या शाळेतील फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि परीक्षा देण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.” असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला