
मुंबई :- राज्यात कोरोना लस (Coronavirus Vaccine) केवळ दोन दिवस पुरेल, इतकाच साठा उपलब्ध आहे. या मुद्द्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पुन्हा तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट केले आहे. रोहित पवारांनी या ट्विटमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांना उपाय सुचवला आहे.
“कोरोनाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सरकार निर्णय घेत असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटले. लसीसंदर्भात राज्यातील विरोधक शांत असले, तरी सरकारने वस्तुस्थिती मांडलीय. त्यामुळे राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा. नाहीतरी सध्या काही राज्यात निवडणूक सुरू असल्याने त्या संपेपर्यंत तिथला कोरोना शांत बसला आहे. त्यामुळे तिथे लसीची तेवढी गरज नाही. तोपर्यंत देशाचा मोठा आर्थिक डोलारा सांभाळत असलेल्या महाराष्ट्राला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन साहेबांनी लसींचा पूर्ण साठा पाठवून द्यावा.” असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
केंद्राचा पुन्हा दुजाभाव
महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) आग्रही मागणीनंतर केंद्र सरकारने गुरुवारी महाराष्ट्रासह अन्य राज्यांना कोरोना लसींचे वाटप केले. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या ७ लाख ४० हजार लशी आल्या आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात दिवसाकाठी ४ लाख लोकांना लस दिली जात आहे. केंद्र सरकारकडून वेगाने पुरवठा झाला, तर ही संख्या ८ लाखापर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. कमी लसी दिल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.
नाहीतरी सध्या काही राज्यात निवडणूक सुरू असल्याने त्या संपेपर्यंत तिथला कोरोना शांत बसला आहे. त्यामुळं तिथं लसीची तेवढी गरज नाही. तोपर्यंत तरी देशाचा मोठा आर्थिक डोलारा सांभाळत असलेल्या महाराष्ट्राला केंद्रीय आरोग्यमंत्री @drharshvardhan साहेबांनी लसींचा पूर्ण साठा पाठवून द्यावा. pic.twitter.com/5KzHnOl9Hs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 8, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला