
मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांना थोडा दिलासा मिळणार आहे. १ एप्रिल २०२१ पासून वीजदर सुमारे दोन टक्के कमी करण्याचा निर्णय एमईआरसीने घेतला आहे. देशात एकीकडे इंधन दरवाढ होत आहे तर सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एमईआरसीने एफएसी (इंधन समायोजन कर) फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहे.
एमईआरसीने दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२० मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याची सुरुवात झाली. मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, इंडस्ट्रीसाठी १० टक्के वीजदर कमी करण्यात आले. तर या वर्षी १ एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीजदर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार…
- महावितरण – रहिवासी इमारतींसाठी एप्रिलपासून १ टक्का तर नॉन रहिवाशांसाठी कंपनी, इंडस्ट्री यांना २.५ टक्के
- बेस्ट – रहिवासी इमारतींसाठी एप्रिलपासून ०.१ टक्का तर नॉन रहिवासी, कंपनी, इंडस्ट्री यांना ०.३-२.७ टक्के
- अदानी – रहिवासी इमारतींसाठी एप्रिलपासून ०.३ टक्के तर नॉन रहिवासी, कंपनी, इंडस्ट्री यांना १.४-१.६ टक्के
- टाटा – रहिवासी इमारतींसाठी एप्रिलपासून ४.३ टक्के तर नॉन रहिवासी, कंपनी, इंडस्ट्री यांना १.१.-५.८ टक्के
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला