
मुंबई :मुख्य सचिन सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी फोन टॅपिंग प्रकरणातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. मात्र, हा अहवाल कुंटे यांनी तयार केलाच नसावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँगेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करुन त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचं काही अनुभवी नेत्यांचं म्हणण आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का?, असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार व मुख्य सचिव असे करणार नाही याची मला खात्री आहे, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करून त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचं काही ‘अनुभवी’ नेत्याचं म्हणणं आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का,असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार व मुख्य सचिव असं करणार नाही याची खात्री आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 27, 2021
दरम्यान राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करुन त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचं काही अनुभवी नेत्यांचं म्हणण आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का?, असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार व मुख्य सचिव असे करणार नाही याची मला खात्री आहे, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला