
मुंबई :- दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मत व्यक्त करताना यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविले.
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ही भारतरत्नं आहेत. खूप मोठी माणसं आहेत. त्यांना अशा गोष्टी करायला सांगणं… ती साधी माणसं आहेत. सरकारने त्यांना सांगितले त्यांनी ट्विट केले; पण आज जे ट्रोल होते त्यांच्यावरच येत असल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
हा काही देशाचा विषय नाही. काही चीनमधून संकट आले, पाकिस्तानमधून आले, शेतकऱ्यांचं संकट आहेच मोठं; पण या सर्व गोष्टींसाठी सर्व लोकांना त्या अक्षयकुमारवरती आटपायचा ना विषय, असे म्हणत राज ठाकरेंनी केंद्र सरकारला टोलाही लगावला. अशा प्रकारचे ट्विट करायला सांगणं. एकाच हॅशटॅगवर सगळ्या लोकांची ट्विट येणं ही खूप मोठी माणसं आहेत. त्यांना सरकारने अशा गोष्टींमध्ये पडायला लावू नये, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही कर्तृत्ववान पण साधी माणसं आहेत. एखादं देशांतर्गत आंदोलन चिघळलं म्हणून बाजू सावरून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी भारतरत्नांना ट्विट करायला सांगणं चुकीचं आहे. pic.twitter.com/hoiewAkIi8
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 6, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला