
औरंगाबाद : महावितरणच्यावतीने औरंगाबाद शहरात दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी शहराच्या विविध भागात विद्युत पुरवठा सलग तीन दिवस विविध वेळी बंद करण्यात येणार होता. या काळात पवित्र रमजान ईद असल्याने शहरातील मुस्लिम समुदायातील सर्व लोक हे घरीच ईदची नमाज अदा करणार आहेत म्हणून खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी महावितरणच्या निर्णयाची गंभीर दखल घेऊन अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना दिल्या की, महावितरणकडून करण्यात येणारी दुरुस्ती व देखभालीची सर्व कामे ईदनंतर करण्यात यावी.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्ती व देखभालीची सर्व कामे तत्काळ रद्द करून ईदनंतरच ती करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच मुख्य अभियंता गणेशकर यांनी खासदार इम्तियाज जलील यांना आश्वासित केले की, विद्युत पुरवठा कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही याची दक्षता महावितरणकडून घेतली जाईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला