
मुंबई : मनसे (MNS) आणि शिवसेनेते गेले काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. मनसेने शिवसेनेचा उल्लेख विरप्पन गॅंग अस केल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला व यामध्ये थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उडी घेतली आणि मनसे हा पक्ष आहे की टाईमपास टोळी अशा शब्दांत मनसेची खिल्ली उडवली होती.त्यानंतर आता मनसेनेही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
अनेक उदाहरणांसह नेमका टाईमपास कशाला म्हणतात याची यादीच मनसेने ट्विट करून सादर केली आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणं आणि अनेक वर्षे तिथं स्मारक न करणं याला टाईमपास म्हणतात, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करण याला टाइम पास म्हणतात
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 5, 2021
औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू” यात शिवसेनेने 30 वर्षं घालवली याला म्हणतात टाइमपास!, मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
किंबहुना, करोना संकटकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचं सोडून मुख्यमंत्री उठता- बसता फेसबुक लाईव्ह करत होते…
याला म्हणतात, टाइमपास!@AUThackeray— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) February 4, 2021
दरम्यान, मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते याला म्हणतात टाईमपास, असंही कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला