
मुंबई : राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील करोनाची परिस्थिती ठाकरे सरकार नियंत्रणात आणू शकले नाही, असा आरोप केला होता. त्यानंतर सरकार सर्वच ठिकाणी अपयशी ठरल्याचं म्हणत भाजपानं राज्यभरात सरकारविरोधात आंदोलनही केलं होती. दरम्यान, काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
“मुंबईचे मॉडेल देशभर राबवा. हे देशासमोरील सर्वोत्तम उदाहरण आहे, असं नीति आयोगानं आणि आयसीएमआरनं म्हटलं आहे. तर दुसरीकडे गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही बिकट आहे, असं गुजरात न्यायालयानं म्हटलं आहे. तरी काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत,” असं म्हणत आव्हाड यांनी विरोधकांना लक्ष केलं आहे.
मुंबईचे मॉडेल देशभर राबवा,देशासमोर सर्वोत्तम उदाहरण आहे असे #नीती_आयोगाने #ICMR म्हंटले आहे.
……#गुजरात मधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडी पेक्षा बिकट आहे असे गुजरात उच्च न्यायालयाने म्हंटल आहे.
…
तरी ही काही #महाराष्ट्रद्रोही #मुंबई ला बदनाम करत आहेत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 28, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला