
कोल्हापूर : मुंबई-पुण्याप्रमाणे कोल्हापुरातही आयटी पार्कची (IT Park) निर्मिती करणार आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केली. यासंदर्भात उद्योजकांची मुंबईत बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात मोठा उद्योग यावा, यासाठी कित्येक महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. त्यामुळेच उद्योगासाठी कोल्हापुरात आयटी पार्क उभारले जाणार. या कामासाठी शंभर एकर जागेची उपलब्धता करून देण्यासाठी बरेचजण समोर आले आहेत. या आयटी पार्कमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. कोल्हापूरच्या या विकासाला गती मिळणार. याचबरोबर अनेक उद्योग कोल्हापुरात कसे येतील, यासाठी प्रयत्नदेखील चालू आहेत. याबाबत लवकरच करारसुद्धा होतील, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला