
दिल्ली :- दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची मोदी सरकारने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे ती कायम राहिल्यास देशासाठी चांगलं नसेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारला दिला.
पवार म्हणाले, मला वाटते यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाऊ शकतो. मी असेही ऐकले आहे की, आंदोलनादरम्यान चार ते पाच जणांनी आत्महत्या केल्या. अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर हे देशासाठी चांगले नाही.
I think the government should take the entire agitation very seriously. There has to be dialogue & solution. I heard… there are four or five suicides. If that type of situation is developing, it’s not good for the country: Nationalist Congress Party chief Sharad Pawar #FarmLaws pic.twitter.com/UaUWpQjOFf
— ANI (@ANI) December 28, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला