
दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात ६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केली. या कायद्यांविरुद्ध जनजागृतीसाठी मोहीम राबवू, असे ते म्हणालेत.
जोपर्यंत कायदा मागे घेत नाही तोपर्यंत घरवापसी नाही, अशी घोषणा पुन्हा त्यांनी दिली. शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही, असेही ते म्हणालेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर गाझीपूर येथे टिकैत यांनी भेट घेतली.
शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले. संजय राऊत यांच्या भेटीबाबत बोलताना राकेश टिकैत म्हणालेत, विरोधक येऊन आम्हाला पाठिंबा देत असतील तर त्यात काही अडचण नाही. पण त्यांनी याचे राजकारण करू नये. कोणी नेते भेटायला येत असतील तर आम्ही काहीच करू शकत नाही.
सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करते आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असा आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी आम्हा सर्व खासदारांना दिला, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Our slogan is – ‘kanoon wapsi nahi, to ghar wapsi nahi’. This agitation will not conclude before October, it will not end anytime soon: Bhartiya Kisan Union (Arajnaitik) leader Rakesh Tikait pic.twitter.com/Vnu649AcIr
— ANI (@ANI) February 2, 2021
There’s no problem if Opposition is coming to support us but it should not be politicised. We can’t do anything if leaders come. The traffic movement has not been blocked by farmers, it is because of the police barricading: BKU leader Rakesh Tikait pic.twitter.com/jejdg3smqI
— ANI (@ANI) February 2, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला