
मुंबई :- गेल्या आकरा दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत.याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या शेतकरी आंदोलनास दिग्गजांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला. मात्र भाजपाने (BJP) शिवसेनचे (Shiv Sena) शेतकरी प्रेम नकली असल्याचे म्हटले आहे.
ही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार दिल्लीला!
बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॅाग्रेस (Congress), शिवसेना व राष्ट्रवादी (NCP) यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पुरेशी मदत दिली नाही. दुध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. ना शेतकऱ्यांना कोणती मदत राज्य सरकारने कोरोना काळात केली नसल्याचं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करुन म्हटलंय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात खासगीकरण सुरू झाले . शरद पवारांचं कृषिमंत्री असताना पाठवलेले पत्र आज समोर आहे, ज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी खासगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीले आहे, असे म्हणत शरद पवारांनीच खासगीकरणाला सुरुवात केल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला .
शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. ना शेतकऱ्यांना कोणती मदत राज्य सरकारने कोरोना काळात केली.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात खाजगीकरण सुरू झाल.
शरद पवारांच कृषिमंत्री असताना पाठवलेले पत्र आज समोर आहे ज्यात शेतकऱ्यांचा हितासाठी खाजगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीले आहे.— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 7, 2020
बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी कॅाग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे.
मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे @OfficeofUT मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अद्याप पुरेशी मदत दिली नाही. दुध उत्पादक —२— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 7, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला