
औरंगाबाद :- निझामगंज कॉलनी येथील ५२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा शनिवारी (दि. ३०) सायंकाळी ५.२० वाजता उपचारादरम्यान मृ़त्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ७० काेरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रविवारी सकाळी ४२ कोरोनाबाधितांची वाढ झाल्याने रुग्णसंख्या १५४० एवढी झाली आहे. त्यापैकी ९८४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले तर ४८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला